कोल्हापूर • प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीत काम करुन गोकुळला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी संघाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत, याची मनाला खंत वाटत आहे. तथापि संघ नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच सेवानिवृत्त व्हावे लागते. अशा कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव गोकुळ नेहमीच ठेवेल असे प्रतिपादन माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके यांनी गोकुळच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी केले.
सत्कार कार्यक्रम गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावरील स्व.आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकाजवळ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्री.नरके म्हणाले, या कर्मचाऱ्यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या काळात अल्प पगारावर कष्टाचे काम केलेले असून, कर्मचाऱ्यांच्या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारासाठी द्यावा व प्रामाणिकपणे समाधानी जीवन जगावे असे सांगून या सर्वांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये ३२ जणांचा समावेश आहे. त्यांचा जेष्ठ संचालक अरूण नरके व उपस्थित संचालकांच्या हस्ते गोकुळच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास जाधव, संचालक धैर्यशील देसार्इ, दिपक पाटील,पी.डी.धुंदरे, उदय पाटील, बाळासो खाडे,विजय तथा बाबा देसाई, रामराजे कुपेकर-देसाई, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर, सौ.अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम. पाटील, व्यवस्थापक प्रशासन डी.के.पाटील व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.