कोल्हापूर • प्रतिनिधी
गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून वैयक्तिक, सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिवविचारच मार्गदर्शक ठरले आहेत, अशा शब्दात गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी शिवजयंतीनिमित्त संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मत व्यक्त केले.
संघाच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन रविंद्र आपटे यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे आपण लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहोत, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी शिवजयंतीनिमित्ताने त्यांनी गोकुळच्या कार्यालयीन कामकाजात भाग घेत आपण तंदुरुस्त आहोत याची झलक दाखविली. गोकुळचे अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील त्यांचे जल्लोषात स्वागत करून भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्यानिमित्त जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व चेअरमन रविंद्र आपटे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके, रणजितसिंह पाटील, जेष्ठ संचालक विश्वास जाधव, संचालक दिपक पाटील, उदय पाटील, बाळासो खाडे, अमरिशसिंह घाटगे, सत्यजीत पाटील, विजय तथा बाबा देसाई, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, व्यवस्थापक प्रशासन डी.के.पाटील, जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील, चेतन नरके, रघु पाटील व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.